भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरेंना कधीही काँग्रेससोबत जाणं मान्य नव्हतं. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या विचारांना केराची टोपली दाखवली. काँग्रेससोबत आघाडी केली. आता तर वंचितसोबतही हात मिळवणी केली आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करणं योग्य नाही, असं म्हणत बावनकुळे यांनी टीका केलीय.