छत्रपती संभाजीनगर : अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. गारपीटीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय. छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड तालुक्यातील जेहुर गावातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय. दिनकर धनवटे या शेतकऱ्याचं अवकाळी पावसामुळे लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. एक-एक रूपया जमवून आणि कर्ज काढून कांद्याची लागवड केली. आता हातातोंडाशी आलेलं पीक अवकाळी पावसामुळे जमीनदोस्त झालंय. गारपीट, पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे पीकाचं नुकसान झालं आहे. त्यामुळे या शेतकऱ्याला आपले अश्रु अनावर झाले आहेत.