दसरा मेळाव्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरु झालीय. ही चर्चा म्हणजे महाराष्ट्रातील युतीचा मार्ग बंद झालाय का? उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर टीका केली त्या पद्धतीने त्यांचा खरंच भाजपसोबत काडीमोडाचा विचार आहे का? असा प्रश्न निर्माण होताय. याच विषयावर सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !