राजकारणात प्रत्येक वक्तव्याला महत्त्व असतं. मुख्यमंत्री जे बोलले त्यानंतर युतीच्या चर्चेला फोडणी बसली. त्यातच शिवेसेनेचे मंत्री अब्दुल सत्तारांनी एक अट बोलून दाखवली. उर्वरित तीन वर्ष उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असतील तर युती होऊ शकते, असं सत्तार म्हणाले. दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना उद्देशून सूचक वक्तव्य केलं. त्यामुळे राज्यात पुन्हा युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र खरंच भविष्यात युती होऊ शकते का? असा प्रश्न उपस्थित होतोय. या विषयावर सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !