“देशात महाविकास आघाडीचं सरकार येणार, राहुल गांधी नेतृत्व करणार”, अमित देशमुखांना विश्वास

“देशात महाविकास आघाडीचं सरकार येणार, राहुल गांधी नेतृत्व करणार”, अमित देशमुखांना विश्वास

| Edited By: | Updated on: Mar 01, 2022 | 5:42 PM

राज्यात महविकास आघाडी झाली आहे, तशीच उद्या देशातही महविकास आघाडी (Mahavikas Aghadi) होऊ शकते आणि त्याचं नेतृत्व राहुल गांधी करतील असं वक्तव्य मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी केलं आहे. त्यामुळे सर्वाच्याच भुवया उचावल्या आहेत. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवायच्या आहेत, काँग्रेस नेत्यांनी आणि कार्यकर्त्यानी त्या तयारीला लागावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. […]

राज्यात महविकास आघाडी झाली आहे, तशीच उद्या देशातही महविकास आघाडी (Mahavikas Aghadi) होऊ शकते आणि त्याचं नेतृत्व राहुल गांधी करतील असं वक्तव्य मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी केलं आहे. त्यामुळे सर्वाच्याच भुवया उचावल्या आहेत. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवायच्या आहेत, काँग्रेस नेत्यांनी आणि कार्यकर्त्यानी त्या तयारीला लागावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. त्यामुळे एकीकडे स्वबळाचा नारा आणि दुसरीकडे देशात युतीचं विधान त्यामुळे कार्यकर्तेही काही काळ कनफ्यूज झाल्याचे दिसून आले. गेल्या काही दिवसांपूर्वीच तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यात दाखल होत मुख्यमंत्री आणि शरद पवारांची भेट घेतली. यावेळी काँग्रेसशिवाय देशात तिसरी आघाडी होणार नाही असा सूर काँग्रेस नेत्यांनी लावल्याचे दिसून आले.