मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या संख्येने वाढ होत आहे. रोज हजारो नवे रुग्ण आढळत आहे. सध्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. याच कारणावरुन राज्य सरकारने केंद्रावर गंभीर आरोप केले आहेत. अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी महाराष्ट्राला रेमडेसिवीर विकू नका, नाही तर कारवाई केली जाईल, अशी धमकी केंद्राने औषध विक्रेत्या कंपन्याना दिल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर पाहा स्पेशल रिपोर्ट…