कोरोनाच्या काळानंतर हा दहीहंडीचा सण राज्यात मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. त्याचा आनंद आपल्याला असून सगळीकडे चांगला जोश आणि उत्साह दिसत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या 50 थरांच्या वक्तव्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, दहीहंडी हा आमचा धार्मिक सण आहे राजकारण करण्यासाठी नाही. मात्र नक्की मलाई कुणी खाली हे पहा पाहायला पाहिजे असा टोला आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लगावला आहे.