मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतरही दादरच्या मार्केटमध्ये नागरिकांची गर्दी. मार्केटमधील लोकांनी तोंडावर मास्क लावले नसून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा अक्षरश: फज्जा उडाला आहे. त्यामुळे आता प्रशासन याविरोधात कठोर पावले उचलणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
कोरोनासह विविध मुद्द्यांवर बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. यावेळी कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. राज्यात 15 ऑगस्टपासून मोठी शिथिलता देण्यात येणार आहे.