नाशिक : उद्धव ठाकरे यांच्या मालेगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे आणि अद्वय हिरे यांच्यातला वाद विकोपाला गेला आहे.अद्वय हिरे यांच्या शिक्षण संस्थेच्या भरती प्रकरणात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप करत काही पीडित आंदोलक आज उपोषणाला बसले आहेत. आम्ही या संस्थेत कामाला लागण्यासाठी पैसे देऊन देखील आम्हाला नोकरी देण्यात आले नाही, असे आरोप या आंदोलकांनी केले आहेत. अद्वय हिरे यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे. त्यामुळे आता हा वाद कोणत्या दिशेने जातो हे पाहावं लागेल.