मुंबई : राज्य सरकारने कोरोना नियम शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये कोरोना निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्यात आले आहेत. तर इतर 11 जिल्ह्यांत तिसऱ्या लेव्हलचे नियम लागू असतील. यामध्ये मुंबई आणि ठाणे येथील कोरोना निर्बंधांचा निर्णय आपत्कालीन विभाग घेणार आहे. येथील लोकसंख्येची घनता आणि कोरोनाच संभाव्य प्रसार लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.