मान्सून उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. राज्यातील अनेक भागात सध्या अवकाळी पाऊस पडत आहे. तर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. अवकाळी पावसामुळे हवेत गारठा निर्माण होऊन उष्णता कमी झाली आहे. उष्णता कमी झाल्याने विजेची मागणी देखील घसरल्याचे समोर आले आहे. विजेची मागणी 19 हजार मेगावॅटच्या खाली घसरली आहे.