आम्ही शिवसेनेच्या (Shivsena) प्रॉपर्टीसाठी बंडखोरी केली असा आरोप आमच्यावर झाला. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार हा हिंदुत्वाचा विचार होता. दोन्ही काँग्रेस बरोबर जाणे हा त्यांचा विचार होता का? आपल्या मूळ पक्षासाठी केलेला हा उठाव आहे. आम्ही कोणतीही वास्तू बळकवण्याचा प्रयत्न करत नाही. संजय राऊत यांच्या विरोधात ठोस पुरावे असल्याशिवाय कोठडी वाढत नाही. त्यांच्या विरोधात भक्कम पुरावे असण्याची शक्यता आहे. हा मुंबईतील एका मोठ्या घोटाळ्यापैकी एक घोटाळा आहे. या मोठ्या घोटाळ्यातील इतर अनेकजण आत आहेत. तर राऊत मात्र बाहेर होते, असं दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणालेत.