मनचे म्हणजे एका आमदाराची अगरबत्ती, अमित म्हणजे कार्यकर्त्यांना सोडुन घरी बसलेला गृहमंत्री. शॅडो कॅबिनेटने अयोध्याला जाता येत नसते रे भोंगामंत्री. तुम्ही गृहमंत्री तर ब्रिजभूषण कोण तुमचा सरंक्षण मंत्री? असा टोला दीपाली सय्यद यांनी राज ठाकरेंना लागवला आहे. त्यामुळे दिपाली सय्यद पुन्हा चर्चेत आल्या आहेत. दिप्पाली सय्याद त्यांच्या ट्विटमुळे नेहमी चर्चेत असतात. माननीय लोक पहिले बोलतात मोदीजींबद्दल, नंतर करतात पवार साहेबांच्या मनासारखे ,वेळ येईल तशी पलटी मारतात, हे संपुर्ण अयोध्यालाच नाही तर देशाला माहीत आहे. माननीय राजसाहेबांनी आजारी असल्याने आराम करावे आदरणीय उद्धव साहेब लवकरच तुम्हाला भेटायला येतील सतत आठवण काढु नये. असंही ट्विट त्यांनी सकाळी केलं आहे. त्यांच्या ट्विटवरती अद्याप शिवसेनेकडून कोणताही रिप्लाय आलेला नाही.