उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या त्या चिठ्ठीत दडलय काय?
आजच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस यांनी खिशातून चिठ्ठी काढून लिहून बोलता बोलता त्यांना लिहून दिल्यावर त्यांनी काय लिहून दिले असेल अशीच चर्चा होऊ लागली आहे.
शिंदे-फडणवीस सरकार येऊन पंधरा दिवस होऊन गेले आहेत मात्र अजूनही त्यांचे मंत्रिमंडळ स्थापन झाले नाही. त्याआधीच या सरकारची चर्चा होत आहे. कधी मुख्यमंत्र्यांसमोरचा माईक हिसकावून घेणं असो की आजची मंत्रालयातील पत्रकार परिषदेत चिठ्ठी लिहून देण्याचा प्रकार असो, त्यामुळे मुख्यमंत्र्यांपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच चर्चा होऊ लागली आहे . आजच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस यांनी खिशातून चिठ्ठी काढून लिहून बोलता बोलता त्यांना लिहून दिल्यावर त्यांनी काय लिहून दिले असेल अशीच चर्चा होऊ लागली आहे.
