राष्ट्रवादी हा जातीय पक्ष असून आतापर्यंत केवळ जातीय राजकारण करण्यातच या पक्षाने धन्यता मानली आहे. आता पुतळा आणवरानंतर चौंडीवर कब्जा करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न राहणार आहे. मात्र, हा प्रयत्न यशस्वी होऊ दिला जाणार नसल्याचे सांगून सदाभाऊ खोत यांनीही राष्ट्रवादीवर टिका केली आहे. सध्या राज्यात जातीभेद करण्यामध्ये राष्ट्रवादीकडून खतपाणी घातले जात आहे. गेल्या अनेक वर्षापासून हाच प्रयत्न राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून केला जात आहे. तसेच देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पोलिस प्रशासनाचा वापर करून कार्यक्रम Highjack करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.