मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप करुन राज्यात खळबळ उडवून दिली होती. या आरोपामुळे देशमुख यांनी हे सर्व आरोप फेटाळले होते. त्यानंतर देशमुख आणि राज्य सरकार यांनी न्यायालयात याचिकासुद्धा दाखल केली होती. या याचिकेवर आज (8 एप्रिल) सुनावणी घेण्यात आली. यावेळी राज्य सरकार आणि देशमुख या दोघांच्यासुद्धा याचिका फेटाळण्यात आल्या आहेत. यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद बोलावून राज्य सरकार आणि देशमुख यांच्यावर टीका केली.