महाराष्ट्रातील सत्ताबदलाने अनेकांना धक्का बसला असला तरी त्यामधीलच दुसरा धक्का होता तो एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदासाठी घोषणा करणे. बंडखोरी केल्यापासून सत्ताबदल झालाच तर पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच असतील अशीच परिस्थिती निर्माण केली गेली होती. मात्र ज्यावेळी मविआचे सरकार जाऊन बंडखोर आमदार आणि भाजपचे सरकार येणार अशी घोषणा झाली त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत धक्कादायक निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी सांगत एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदी निवड केली. त्यांच्या नावाची घोषणा फडणवीस यांनी केली असली तरी त्यापाठीमागचे राजकारण मात्र भविष्यात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.