राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. 2019 चा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांची खेळी असल्याचा माझा कयास आहे, असं जयंत पाटील म्हणाले. त्यावर देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता आज प्रजासत्ताक दिन आहे. त्यामुळे कोणत्याही राजकीय विषयावर बोलणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.