महाविकास आघाडीत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आमनेसामने येत असल्याचं दिसत आहे. कारण पटोलेंच्या स्वबळाच्या घोषणेवरुन शरद पवारांनी काँग्रेस नेत्यांना उघडपणे विचारणा केली आहे. काँग्रेस पक्षपातळीवर स्वतंत्र लढण्याचा खरंच निर्णय झालाय का? असा प्रश्न शरद पवार यांनी विचारला आहे. तर राष्ट्रवादीने 2014 मध्ये धोका दिल्याने काम सुरु केल्याचं पटोले म्हणाले. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !