गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
विदर्भात महिनाभरापासून पावसानं खंड दिल्यानं खरीप पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे वाशिममध्ये, तर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे अमरावतीत दौरा करत आहेत. राज्य सरकारच्या वतीने तातडीने मदत दिली जाईल, असे आश्वासन मंत्र्यांनी दिले असून, एनडीआरएफच्या मदतीची प्रतीक्षा केली जाणार नाही.
विदर्भात गेल्या महिनाभरापासून पावसानं दडी मारल्यामुळे खरीप पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या गंभीर दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पाहणी दौरा सुरू केला. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे वाशिम जिल्ह्यामध्ये शेती पिकांची पाहणी करत शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत, जेणेकरून त्यांना भेडसावणाऱ्या समस्या थेट समजू शकतील. दुसरीकडे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे अमरावती जिल्ह्याच्या दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करणार आहेत.
राज्य सरकारने मदतीसंदर्भात महत्त्वाचं आश्वासन दिलं आहे. एनडीआरएफ (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी) च्या मदतीची वाट न पाहता, राज्य सरकारच्या वतीने तातडीने मदत केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. एनडीआरएफकडून मदत मिळाल्यास ती नंतर त्यातनं भरपाई केली जाईल. ज्येष्ठ नेते पवार साहेब यांनी पत्र पाठवून दिलेल्या सूचनांचेही सरकारने स्वागत केले आहे. राज्य सरकार आपले कर्तव्य योग्यरित्या पार पाडत असून, इतरही सूचना ऐकण्यास तयार असल्याचे मंत्र्यांनी सांगितले.
