एकनाथ खडसे (Eknath Khadse) मुक्ताईनगरच्या संवाद यात्रेत गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर चांगलेच भडकले. पाच वर्षांच्या कालखंडात गिरीश महाजन जलसंपदा मंत्री असताना एकावेळेसही नाथाभाऊंचा मतदारसंघ असल्यामुळे मुक्ताईनगरला फिरकले नाहीत, अरे हा दुष्काळी तालुका आहे. सिंचनाचा प्रश्न आहे, एक रुपया त्यांनी दिला नाही, या गद्दारांना धडा शिकवला पाहिजे, असं एकनाथ खडसे म्हणाले.