देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल: “लोकशाही अमान्य असलेले पळपुटे”

देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल: “लोकशाही अमान्य असलेले पळपुटे”

| Updated on: Aug 13, 2026 | 3:29 PM

नाही असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर टीकास्त्र डागलंय. विरोधकांना लोकशाही मान्य नाहीये, ते लोकशाही विरोधी आहेत असंही मुख्यमंत्री म्हणतात. विरोधकांनी हिम्मत दाखवावी आणि संसदेत चर्चा करावी असंही मुख्यमंत्री म्हणतात. विरोधकांना झारखंडवरुनही उत्तर द्यावं लागेल असं फडणवीसांनी म्हटलंय. कोणत्याही पक्षामध्ये संसद फेस करायची हिम्मत नाही. हे पळपुटे लोक आहेत, भगोडे आहेत. चर्चेची जागा संसद आहे, […]

नाही असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर टीकास्त्र डागलंय. विरोधकांना लोकशाही मान्य नाहीये, ते लोकशाही विरोधी आहेत असंही मुख्यमंत्री म्हणतात. विरोधकांनी हिम्मत दाखवावी आणि संसदेत चर्चा करावी असंही मुख्यमंत्री म्हणतात. विरोधकांना झारखंडवरुनही उत्तर द्यावं लागेल असं फडणवीसांनी म्हटलंय. कोणत्याही पक्षामध्ये संसद फेस करायची हिम्मत नाही. हे पळपुटे लोक आहेत, भगोडे आहेत. चर्चेची जागा संसद आहे, चर्चेची जागा चौक नाही. जर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर तुमचा विश्वास असेल तर हिम्मत दाखवा आणि संसदेत चर्चा करा. तुमच्यात हिम्मत नाहीये. पहिल्यांदा त्यांनी बहाणा बनवला अमितभाई येत नाहीयेत. अमितभाईंनी पत्र दिलं तुम्ही चर्चेला या मी उत्तर द्यायला तयार आहे. मग यांना तोंड दाखवायला जागा राहिली नाही. तोंड काळं झालं. तर संसदेतनं तोंड लपवून पळालेले भगोडे आहेत. यांना लोकशाही मान्य नाही, हे लोकशाही विरोधी आहेत.

Published on: Aug 13, 2026 3:29 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us