अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण झालं आहे. अजूनही सुशांतसिंहच्या मृत्यूचं गूढ उलगडलं नाहीये. त्यावरून राष्ट्रवादीने भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येच्या नावावर भाजपला बिहार निवडणूक लढवायची होती. त्यामुळे सीबीआयला पुढे करून महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे कटकारस्थान रचण्यात आले होते, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.