शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. या संवादामध्ये संजय राऊत यांनी ईडीच्या कारवाया, परमबीर सिंगयांच्याकडून करण्यात आलेले आरोप, नितेश राणे यांची अटक आणि गोवा विधानसभा निवडणुकीवर भाष्य केलं. यावेळी प्रवीण राऊत यांच्यावर ईडीकडून (ED) करण्यात येत असलेल्या कारवाईबद्दल विचारलं असता या सरकारमध्ये राजकीय विरोधकांचे नातेवाईक यांच्यावर कारवाई केली जाते. आम्ही त्या सहन करु , असं संजय राऊत म्हणाले. त्यांना सर्च करु द्या, मी त्यांना विचारतोय कुछ मिला क्या? हा खेळ सुरु आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर केली.