आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी : सात लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर लागणार नाही, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली आहे. सर्वसामान्य लोकांसाठी ही सर्वात मोठी घोषणा आहे. मध्यमवर्गायांना हा सर्वात मोठा दिलासा आहे. याआधी पाच लाखांपर्यंत करमुक्ती होती ती आता सात लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे मध्यमवर्गीयांना या बजेटमुळे मोठा दिलासा मिळालाय. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना मिळालेलं हे सर्वात दिलासादायक गिफ्ट आहे.