रत्नागिरी : तौत्के चक्रीवादळाचा फटका आता रत्नागिरीच्या किनारपट्टीला बसतोय, रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावर अंगावर थरकाप उडवेल असा रौद्र रुप बघायला मिळतोय, जवळपास चार ते पाच फुटांपर्यंत लाटा उसळत आहे, समुद्राचं पाणी आता रस्त्यावर आलं आहे. तौत्के वादळामुळे गोव्यात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झालेय. अनेक ठिकाणी झाड आणि इलेट्रीक पोल कोसळले.