सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. अखेर राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. राज्यापालांनी बहुमत सिद्ध करण्यासंदर्भातील पत्र मुखमंत्र्यांना पाठवले आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकारला उद्याच बहुमत सिद्ध करावे लागेल. तर दुसरीकडे आता चर्चेची सर्व दारे बंद झाल्याची प्रतिक्रिया बंडखोर आमदारांच्या गटाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे उद्या बहुमत सिद्ध करण्याचे मोठे आव्हान ठाकरे सरकार पुढे असणार आहे.