मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शनिवारी बीकेसीतील सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर सडकून टीका केली. त्यानंतर रविवारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही उत्तरसभा घेतली. त्यावेळी भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. दरम्यान, आम्ही पोलखोल सभा घेतल्या. मुख्यमंत्री महोदय तुमच्याकडून उत्तराची अपेक्षा होती. काश्मीरमध्ये राहुल भटचं काय झालं विचारतात? तुमच्या काय संबंध? मुंबईत डॉ. अमरापुरकरांचा मृत्यू का झाला? मुंबई तुंबल्यामुळे त्यांचा जीव गेला. त्याबाबत तुम्ही का बोलत नाही, असा सवालही शेलार यांनी उपस्थित केला.