ESMA | आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर देशात ESMA कायदा लागू

ESMA | आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर देशात ESMA कायदा लागू

| Updated on: Mar 10, 2026 | 5:20 PM

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता भारताच्या ऊर्जा क्षेत्रावरही होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे देशात घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या टंचाईची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत संपूर्ण देशात Essential Services Maintenance Act (ESMA) लागू केला आहे.

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता भारताच्या ऊर्जा क्षेत्रावरही होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे देशात घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या टंचाईची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत संपूर्ण देशात Essential Services Maintenance Act (ESMA) लागू केला आहे. गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवणे, तसेच साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारकडून घरगुती गॅस पुरवठ्याला प्राधान्य दिले जाणार असून नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत. तसेच गॅस वितरण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवून परिस्थिती सुरळीत राखण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे.

Published on: Mar 10, 2026 05:20 PM
Follow Us