झारखंडमध्ये (Jharkhand) झालेल्या त्रिकूट रोपवेच्या (Ropeway) अपघातात 48 जण वीस तासांपासून अडकले आहेत. तर अडकलेल्या लोकांना बाहेर काढताना लष्कराला अडचणी असल्याची प्राथमिक माहिती समजली आहे. झारखंडचा सर्वात उंच रोपवे आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजता त्रिकूट रोपवे ट्रॉली एकमेकांवर आदळली. त्यामुळे लोक टेकडीवर अडकले आहेत. एनडीआरएफने (NDRF) रात्री उशिरापासूनच बचावकार्य सुरू केले. यानंतर लष्करालाही मदतीसाठी पाचारण करण्यात आले आहे. मात्र आतापर्यंत लोकांना सुखरूप परत आणता आले नाही. झालेल्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृ्त्यू आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत.