भूषण पाटील, Tv9 मराठी, प्रतिनिधी, कोल्हापूर : आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. कोल्हापुरातही (Kolhapur) उत्साहाचं वातावरण आहे. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात (Ambabai Mandir) घटस्थापनेच्या विधीला सुरुवात झालीय. विधी पूर्ण होताच मंदिर परिसरात तोफ उडवत सलामी दिली गेली. तोफेच्या सलामीनंतर करवीर नगरीतील नवरात्रोत्सवाला (Navratra Utasav) आता सुरुवात झाली आहे. कोरोनोनंतर होणारा पहिला नवरात्र उत्सव आहे. त्यामुळे कोल्हापुरात येणाऱ्या भाविकांची संख्या आता वाढते आहे.