Rain News | कोकण किनारपट्टीवर वादळी पावसाचा इशारा, शेतकरी चिंतेत

Rain News | कोकण किनारपट्टीवर वादळी पावसाचा इशारा, शेतकरी चिंतेत

| Updated on: May 17, 2026 | 11:00 AM

कोकण किनारपट्टीवर आगामी काही दिवसांत हवामानाचा जोरदार परिणाम पाहायला मिळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने 18 मेपासून वादळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने कोकणातील शेतकरी आणि बागायतदारांना सतर्कतेचा इशारा देत महत्त्वाचा सल्ला जारी केला आहे.

कोकण किनारपट्टीवर आगामी काही दिवसांत हवामानाचा जोरदार परिणाम पाहायला मिळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने 18 मेपासून वादळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने कोकणातील शेतकरी आणि बागायतदारांना सतर्कतेचा इशारा देत महत्त्वाचा सल्ला जारी केला आहे.
विशेषतः आंबा आणि काजू उत्पादकांना काढणीसाठी तयार झालेले पीक तातडीने काढून सुरक्षित ठिकाणी साठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे झाडांवरील फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन आवश्यक खबरदारी घ्यावी, असे कृषी विभागाने म्हटले आहे.
दरम्यान, कोकणातील अनेक भागांमध्ये आधीच उष्णता आणि वातावरणातील बदलांचा परिणाम पिकांवर होत असल्याचे चित्र आहे. त्यातच आता वादळी पावसाचा इशारा मिळाल्याने आंबा आणि काजू बागायतदारांमध्ये चिंता वाढली आहे. हवामान विभागाकडून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात असून, नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Published on: May 17, 2026 10:54 AM
Follow Us