जे वंचित आहेत त्यांनाच वंचितांच्या वेदना माहिती आहेत. सध्या गृहीत धरले जात असल्याने ओबीसींना ताकद दाखवावी लागणार आहे. इतर समाजाला दहावेळा मुख्यमंत्री पदाची संधी दिली जातेय. भटक्या विमुक्तांच्या समाजाला किमान दोन वेळा तरी मुख्यमंत्रिपदाची संधी द्यावी, असं वक्तव्य राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. ओबीसी परिषदेच्या निमित्ताने विजय वडेट्टीवर बीडमध्ये आले होते. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी आक्रमक पवित्रा घेत ओबीसींची राजकीय आणि सामाजिक ताकद विषद केली.