MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100

| Updated on: Sep 28, 2022 | 9:05 AM

तर राज्यातील सत्तासंघर्षाचा चेंडू आता निवडणूक आयोगाकडे गेला आहे. तर खरी शिवसेना कोणाची याचा फैसला निवडणूक आयोग करणार आहे.

Follow us on

केंद्रीय गृहमंत्रीलयाने आज पीएफआय संबंधीत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. पीएफआय आणि पीएफआयशी संबंधीत संघटनांवर भारतात पाच वर्षांसाठी बंदी घालण्यात येणार आहे. तसेच देशातील विविध ठिकाणी एनआयए पुन्हा छापेमारी करत तब्बल 170 जनांना अटक केली आहे. तर राज्यातील सत्तासंघर्षाचा चेंडू आता निवडणूक आयोगाकडे गेला आहे. तर खरी शिवसेना कोणाची याचा फैसला निवडणूक आयोग करणार आहे. याचदरम्यान 12 आमदारांच्या निवडीलाही खो बसला आहे. तर काल झालेल्या सुनावणीनंतर उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर पुन्हा एकदा हल्ला चढवला. यावेळी ते म्हणाले कितीही अफजल खान आले तरि घाबरणार नाही, असे ठाकरे म्हणाले. त्याचबरोबर रखडलेल्या नियुक्तांचे पत्र उमेदवारांना मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आली. तर अमरावतीत शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता. त्याप्रकरणी आणखी चार जणांना अटक करण्यात आली.