Sudhir Das Maharaj | महंत सुधीरदास महाराज शास्त्रर्थ सभेत आक्रमक, महंत भेटले मारामारीला उठले

| Updated on: May 31, 2022 | 8:10 PM

कर्नाटकातील किष्किंदा मठाधिपती महंत गोविंददास महाराज यांनी किष्किंदा हेच हनुमानाचे जन्मस्थान असल्याचा दावा केला. त्याचवेळी नाशिकच्या महंतांनी अंजनेरी हेच हनुमानाचं जन्मस्थळ असल्याचं म्हटलंय. त्यावर महंत गोविंददास महाराज हे आपल्या दाव्यावर ठाम राहत त्यांनी नाशिकच्या साधू महंतांना आव्हान दिलं.

Follow us on

नाशिक : हनुमानाच्या (Hanuman) जन्मस्थळावरुन सुरु झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी नाशिकमध्ये शास्त्रार्थ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. पण या शास्त्रार्थ सभेत (Shastrartha Sabha) मारुतीराया बाजुलाच राहिला आणि साधु-महंत आपसांत भिडल्याचं चित्र पाहायला मिळालं. नाशिकमधील एका महंतांनी जगद्गुरु शंकराचार्य (Shankaracharya) यांना उल्लेख काँग्रेसी असा केला आणि त्यानंतर वादाला तोंड फुटलं. शंकराचार्यांची माफी मागावी, अशी आक्रमक मागणी त्यानंतर लावून धरण्यात आली. तत्पूर्वी आसनव्यवस्थेवरुनही हे साधू-महंत एकमेकांसमोर उभे ठाकल्याचं पाहायला मिळालं.