गोवा आणि कर्नाटकात थैमान घालणाऱ्या तौत्के वादळाचं संकट अजून टळलेलं नाही. पुढच्या काही तासात वादळाचा तडाखा वाढू शकतो, म्हणून कोकणमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, उरण तालुक्यातील 1600 नागरिकांचं स्थलांतरण करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे कोरोनाचं संकट असताना मुंबई महापालिका सुद्धा संभाव्य धोक्यामुळे सावध झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !