tv9 Marathi Special Report | गॅस सिलेंडरवरून राजकारण तापलं; अफवांमुळे रांगा लागल्याचा फडणवीसांचा दावा

tv9 Marathi Special Report | गॅस सिलेंडरवरून राजकारण तापलं; अफवांमुळे रांगा लागल्याचा फडणवीसांचा दावा

| Updated on: Mar 15, 2026 | 12:28 PM

महाराष्ट्रात गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात कुठेही सिलेंडरचा तुटवडा नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र काँग्रेसकडून चुकीच्या अफवा पसरवल्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे, असा आरोप त्यांनी केला.

महाराष्ट्रात गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात कुठेही सिलेंडरचा तुटवडा नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र काँग्रेसकडून चुकीच्या अफवा पसरवल्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे, असा आरोप त्यांनी केला. या अफवांमुळे अनेक ठिकाणी नागरिकांनी घाईघाईने गॅस सिलेंडर घेण्यासाठी रांगा लावल्याचे चित्र दिसत आहे. गॅस सिलेंडरच्या मुद्द्यावरून फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. राज्यात पुरेसा साठा असतानाही काँग्रेसकडून चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा त्यांनी आरोप केला. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून जाण्याची गरज नाही, असे आवाहनही त्यांनी केले. सरकारकडून पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Published on: Mar 15, 2026 12:28 PM
Follow Us