ज्याची भीती तेच घडलं! पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर, शत्रुघ्न सिन्हासह दिग्गज चेहऱ्यांनी सोडली TMCची साथ?
पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी बंडाळी झाल्याची चर्चा सुरू आहे. पक्षातील 19 लोकसभा खासदारांनी वेगळा गट तयार केल्याची माहिती समोर आली आहे. या बंडखोर गटात माजी क्रिकेटपटू युसुफ पठाण, अभिनेता आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा तसेच सायोनी घोष यांची नावे चर्चेत आहेत.
पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी बंडाळी झाल्याची चर्चा सुरू आहे. पक्षातील 19 लोकसभा खासदारांनी वेगळा गट तयार केल्याची माहिती समोर आली आहे. या बंडखोर गटात माजी क्रिकेटपटू युसुफ पठाण, अभिनेता आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा तसेच सायोनी घोष यांची नावे चर्चेत आहेत.
काकोली घोष दस्तिदार यांच्या नेतृत्वाखाली या खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केल्याचे सांगितले जात आहे. या गटाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवत स्वतंत्र गटाला मान्यता देण्याची मागणी केली आहे. तृणमूल काँग्रेसकडे सध्या 28 खासदार आहेत. त्यामुळे वेगळा गट मान्य होण्यासाठी दोन-तृतीयांश खासदारांची आवश्यकता असल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत.
दरम्यान, ममता बॅनर्जी गटातील कल्याण बॅनर्जी आणि कीर्ती आझाद यांनी बंडखोरांकडे 19 खासदार नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात पुढील काही दिवसांत मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बंडखोरी करणाऱ्यांच्या नावाची यादी
- शत्रुघ्न सिन्हा (आसनसोल)
- काकोली घोष (बरसात)
- जगदीश चंद्र बसुनिया (कूच बिहार)
- खली उर रहमान (जंगीपुर)
- यूसुफ पठान (बहरामपुर)
- अबू ताहिर खान (मुर्शिदाबाद)
- पार्थ भौमिक (बैरकपुर)
- बापी हलधर (मथुरापुर)
- सायोनी घोष (जादवपुर)
- माला रॉय (कोलकाता साउथ)
- मिताली बाग (आरामबाग)
- दीपक अधिकारी (घाटल)
- कालीपद सोरेन (झालग्राम)
- जून मालिया (मेदिनीपुर)
- अरूप चक्रवर्ती (बांकुरा)
- शर्मिला सरकार (वर्धमान ईस्ट)
- असित कुमार मल्ल (बोलपुर)
- शताब्दी रॉय (बीरभूम)
- रचना बनर्जी (हुगली)
