मुंबई : राज्यात कडक निर्बंध लावल्यामुळे सर्व मजुरांचा काम बंद पडले. त्यामुळे हे सर्व मजूर आता आपल्या गावी जाण्यासाठी मुंबईच्या वेगवेगळा भागामधून कुर्ला, लोकमान्य तिळक टर्मिनलवर गर्दी करत आहेत. सध्या मोठा संख्येने या ठिकाणी पोलिसांना बंदोबस्त करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर मुंबईचं कुर्ला, लोकमान्य तिळक टर्मिनलवर परप्रांतीय मजुरांनी गावी जाण्यासाठी प्रचंड गर्दी केली आहे.