राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला. या अपघातात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम सुखरूप आहेत. विश्वजीत कदम हे आपल्या मतदारसंघातील अंकलखोप येथे पूर परिस्थितीची पाहणी करत होते. त्यावेळी अचानक गावातील एक इसम त्यांच्या ताफ्याच्या आडवा आला. त्याला वाचविण्यासाठी ताफ्यातील एका गाडीचा ताबा सुटला. ती गाडी रस्त्याच्या पलीकडे जाऊन गाडीचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, गाडी थेट रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी झाली.