उध्दव ठाकरे हिंदुत्व सोडणार नाही असं लिहून देणार का?, प्रतिज्ञापत्रावरून संदीप देशपांडेचा टोला

| Updated on: Jul 02, 2022 | 9:46 AM

एकनिष्ठतेच्या प्रमाणपत्रावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. उध्दव ठाकरे हिंदुत्व सोडणार नाही असं लिहून देणार का?, असा सवाल देशपांडे यांनी केला आहे.

Follow us on

आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे आता शिवसेनेने सावध पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. आता शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांना एकनिष्ठतेचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. आमचा ठाकरेंच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे असे हे पत्र असणार आहे. आता यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. उध्दव ठाकरे हिंदुत्व सोडणार नाही असं लिहून देणार का?, असा सवाल देशपांडे यांनी केला आहे.