मोठी बातमी! मोबाईल घेतलाय EMI वर? हप्ता थकवला तर सावधान! RBI च्या नव्या नियमाने वाढली चिंता, नेमकं काय होणार?
मोबाईल युजर्ससाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तुम्ही EMI किंवा कर्जावर मोबाईल, टॅबलेट किंवा लॅपटॉप खरेदी केला असेल आणि त्याचा हप्ता थकवला असेल, तर तुमच्यावर काही निर्बंध लागू होऊ शकतात. RBI च्या नव्या नियमांबाबत सध्या चर्चा सुरू असून, EMI थकवणाऱ्या ग्राहकांवर कारवाईची प्रक्रिया अधिक कडक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मोबाईल युजर्ससाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तुम्ही EMI किंवा कर्जावर मोबाईल, टॅबलेट किंवा लॅपटॉप खरेदी केला असेल आणि त्याचा हप्ता थकवला असेल, तर तुमच्यावर काही निर्बंध लागू होऊ शकतात. RBI च्या नव्या नियमांबाबत सध्या चर्चा सुरू असून, EMI थकवणाऱ्या ग्राहकांवर कारवाईची प्रक्रिया अधिक कडक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, EMI वर मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस खरेदी केल्यानंतर हप्ता भरण्यास 30 दिवसांचा विलंब झाल्यास ग्राहकाला आधी रिमाइंडर पाठवला जाऊ शकतो. त्यानंतर 30 ते 60 दिवसांपर्यंत पेमेंट थकीत राहिल्यास कर्ज करारातील अटींनुसार ग्राहकावर हळूहळू काही निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे.
या कालावधीत ग्राहकाचे आउटगोइंग कॉल सुरू राहू शकतात. मात्र, कर्जाचा हप्ता 60 दिवसांपेक्षा अधिक काळ थकीत राहिल्यास, संबंधित कर्ज करारातील अटींनुसार मोबाईल डिव्हाइस किंवा त्यासंबंधित सेवा मर्यादित किंवा बंद करण्याची कारवाई होऊ शकते.
दरम्यान, या नव्या नियमांची अंमलबजावणी 1 ऑक्टोबर 2026 ऐवजी 1 जानेवारी 2027 पासून करण्याची तारीख करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे EMI वर इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी आपल्या कर्जाच्या अटी आणि EMI पेमेंटची स्थिती तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्त्वाचे: “EMI थकला की RBI थेट फोन लॉक करणार” असा अर्थ घेणे योग्य नाही. प्रत्यक्ष कारवाई ही संबंधित कर्जदाता, कर्ज करार आणि लागू नियमांवर अवलंबून असते.
