मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय नेत्यांची मोदींनी बैठक बोलावली आहे. त्यात काही महत्वाच्याा मुद्द्यावर चर्चा होणार आहे. काँग्रेसनेही 29 नोव्हेंबरला विरोधी पक्षातील विविध नेत्यांची बैठक बोलवली आहे. सर्वपक्षीय बैठकीत सर्व सत्राच्या दरम्यानं होणाऱ्या महत्वपूर्ण कामकाजाबाबत आणि अजेंडा याबाबत चर्चा होईल. दोन्ही सभागृहात विविध मुद्यावर चर्चा करत असताना विरोधी पक्षांनी सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी विरोधी पक्षातील नेत्यांशी संवाद साधणार आहेत. या अधिवेशनात सरकारने 26 महत्वाच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी सूची तायर केली आहे.