मुंबई : पुणे, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरूच आहे. मुसळधार पाऊस सुरू असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. तर दुसरीकडे पुढील दोन दिवस या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पालघरमधील शाळांना आज सुटी देण्यात आली आहे. पावसाचा अंदाज घेऊन शाळेबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.