सध्या महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीवरून मोठं राजकारण तापलं आहे. मोठ्या प्रमाणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वार-पलटवार होत आहेत. अशातच खासदार संजय राऊत यांनी मोदींवर बोचरी टीका केली आहे. मोदी यांच्या काळात महिलांना आपली मंगळसूत्र विकावी लागली अशी टीका खासदार संजय राऊत यांनी मोदींवर केली आहे. ज्या माणसाने घरातील मंगळसुत्राला मान दिला नाही त्यांनी इतरांच्या मंगळसूत्रांची उठाठेव करु नये. असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे