मुंबई:मराठ्यांच्या इतिहासात पानिपतच्या तिसऱ्या लढाईला सर्वाधिक महत्व आहे. या एका लढाईनं मराठा साम्राज्याला घरघर लागली. ही लढाई मराठे आणि अब्दाली यांच्यात लढली गेली असा इतिहास सांगतो. तो बरोबरही आहे. पण याच लढाईत नागा साधूही मराठ्यांविरोधात लढत होते हे इतिहासकारांशिवाय इतर कुणाला फारसं माहित नाही.