पंढरपूर : आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी सर्व संतांच्या पालख्या आळंदी येथून पंढरपूरकडे मार्गस्थ होत असतात. पंढरपूर येथील वाखरी येथे शेवटचं रिंगण झाल्यानंतर या सर्व संतांच्या पालख्यांची भेट होत असते. मात्र, नामदेव महाराज यांची पालखी कधीही आळंदी येथून पंढरपूरकडे येत नाही. तर ती पंढरपूरमधून वाखरी येथे भेटीकरता जात असते. त्याविषयी नामदेव महाराज यांचे वंशज नामदास महाराज यांनी सविस्तर माहिती दिली आहे.