2019 चा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांची खेळी असल्याचा माझा कयास आहे, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. जयंत पाटील यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. त्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया आली आहे. पहाटेच्या शपथविधीचा आणि आमचा काहीही संबंध नाही, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणालेत.