अमरावती : खासदार नवनीत राणा यांनी कसबा पोटनिवडणूक आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीवर भाष्य केलंय. “या दोन्ही पोटविधानसभा मतदारसंघात निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी स्वार्थपोटी काही निर्णय घेतले. उद्धव ठाकरे यांची बेमानी देशाने पाहिली. पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची परंपरा आहे. ही परंपरा महाराष्ट्रची कायम ठेवली पाहिजे”, असं नवनीत राणा म्हणाल्यात.