शिवसेना ठाकरे गट आणि वंचित यांची आघाडी झाली आहे. यावर खासदार नवनीत राणा यांनी भाष्य केलंय. महाराष्ट्रातील राजकारण कल्पनेच्या पलीकडं चाललं आहे. प्रकाश आंबेडकर यांना उद्धव ठाकरे यांच्यासमोरचं काय चित्र दिसत आहे. उद्धव ठाकरे वंचितसोबत जाऊन एक पक्ष स्थापन करणार आहेत का? की वंचितमध्ये उद्धव ठाकरे प्रवेश करणार आहेत? कारण सध्याचं राजकारण पाहता येणाऱ्या काळात काहीही होऊ शकतं, असं नवनीत राणा म्हणाल्या आहेत.